Type Here to Get Search Results !

परसुल येथे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिननिमित्त सोनल खांगळ या मुलीने भरदार शब्दात केले भाषण


प्रतिनिधी :  राजाराम खांगळ उर्फ आर के मामा 
चांदवड तालुक्यात २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा करतांना शासन स्तरावरील सर्व शासकीय कार्यालय, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद,पंचायत समिती अंतर्गत येणारे विविध शासकीय कार्यालय, महसूल विभाग तहसील कार्यालय, तसेच सहकार क्षेत्रातील वि.वि. कार्य. सेवा सोसा.अशा विविध संस्थांमध्ये स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात.
अशा नेहमीच्या कार्यक्रमाप्रमाणेच २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा करतांना परसुल गावातील पाल्य पालक शेतकरी दत्तू खांगळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येऊन शाळेतील विद्यार्थिनींनी ध्वजारोहण गीत गायन करून जिल्हा परिषद अंतर्गत आदर्श प्राथमिक शाळा परसुल येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आदर्श प्राथमिक शाळेच्या आदर्श मुख्याध्यापिका श्रीमती रत्ना सूर्यवंशी मॅडम यांनी अथक परिश्रम घेऊन विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करीत ध्वजारोहणाच्या ठिकाणी येणाऱ्या प्रमुख अतिथी, ग्रामस्थांना वेलकम नावाची रांगोळी काढून स्वागत केले. तसेच ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा,  विविध प्रकारे फुलफुलांचे चित्रीकरण करून रंगीबेरंगी स्वरूपाच्या रंगरंगोटीयुक्त रांगोळ्या काढून शाळेमध्ये विविध स्वरूपाचे सांस्कृतिक कार्यक्रम नियोजन करून सर्व प्राथमिक शाळेचे सहकारी शिक्षक शिक्षिका यांच्या सहकार्याने छोट्या मोठ्या विद्यार्थी मुलामुलींना सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन करून कार्यक्रमाची आदर्शवत शोभा वाढवली.
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने  व्यसनमुक्ती शपथ देण्यात येऊन जागृती देखील करण्यात आली. परंतु अशा प्रकारे व्यसनमुक्ती होत नसते. तर आदर्श विचारसरणीने व्यसनमुक्तीचे उत्पादित अमली पदार्थ निर्मितीवर बंधन आणली पाहिजे. तेव्हा खरी व्यसनमुक्ती संस्कृती अस्तित्वातील येईल. याचा देखील प्रशासनाने विचार केला पाहिजे. 
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सोनल खांगळ या विद्यार्थिनीने भारतीय नागरीकांना संबोधित भाषण करून १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन व २६ जाने. प्रजासत्ताक दिन यामधील फरक सांगून आपल्या देशाची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मसुदा समिती अंतर्गत आदर्श लिखित केलेली घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते प्रजेला कशी बहाल केली. तिचे महत्व सर्व उपस्थितांना सांगितले.
परसुल गावात व तालुक्यात लोकशाहीच्या माध्यमातून फक्त नि फक्त एकच उणीव दिसून येत आहे. ती म्हणजे शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रम व आनंद उत्साह सादर केल्या जाणाऱ्या  पाल्याचे कौतुकासाठी व प्राप्त झालेल्या लोक संविधान घटनेचे स्वागत करण्यासाठी खेडोपाडी प्रत्येक गावातील ग्रामस्थ, पदाधिकारी, पालक, वडीलधाऱ्या नागरिकांसह उपस्थिती मात्र दिसून येत नाही. अशा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून खरी लोकशाही संपुष्टात येत असल्याचे चित्र जनतेतून दिसून येत आहे. 
शासनाने अशा सार्वजनिक कार्यक्रमाच्या दिवशी खेडोपाडी ग्रामसभा आयोजित करुन ग्रामस्थ उपस्थिती वाढावी. अशा सूचना देखील केलेल्या असताना ग्रामसभेला कोरम पूर्ण होत नाही. ये देखील निष्काळजीपणाने कामकाज करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची चुक नाही तर घोडचूक आहे. 
ग्रामस्थांमध्ये ग्रामसभा, शासन निर्णय, परिपत्रके, जनतेचे अधिकार याबाबत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी व त्यांच्या अखत्यारित असलेले ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक यांनी जनजागृतीची करावी. नागरीकांना त्यांचे खुर्चीचे अधिकार दाखविण्यापेक्षा कर्तव्य व जबाबदारी पार पाडावी. गावातील सर्व ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच पदाधिकारी सदस्य ग्रामस्थ यांच्यामार्फत जनजागृती करून आदर्श शासनाचे आदर्श काम आदर्श लोकशाहीबद्दलचे महत्त्व, संविधान घटनेचे गांभीर्य, तळागाळात पोहोचवुन जनजागृती करावी. म्हणजेच खरी प्रजेची सत्ता प्रजेच्या हाती बहाल केली. खरा प्रजासत्ताक दिन साजरा केला. याचे महत्त्व तळागाळातील सामान्य नागरिकांना कळेल.

Post a Comment

0 Comments